कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने र.न.प.चे कामकाज सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेमध्ये दोन दिवसानंतर ठेक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाज सुरू झाले आहे.
कायम कर्मचारी ६ ऑगस्टपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांचीही सेवा मिळत नव्हती. गुरुवारी मात्र हा कर्मचारी वर्ग कामावर आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रशासकीय कामकाजासह खड्डे भरणे आणि कचरा उचलण्याचे कामही सुरू झाले आहे. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
ठेक्यावरील कर्मचाऱ्यांनीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने दोन दिवस रत्नागिरी नगर परिषदेत कोणतेच कामकाज झाले नाही. त्यामुळे कोणत्याही सेवासुद्धा मिळाल्या नाहीत. त्याचबरोबर या आंदोलनामुळे शहराच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आणि कचरा उचलण्याचे काम बंद होते. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी ठेक्यावरील कर्मचाऱ्यांना विनंती केल्याने गुरूवारपासून हा कर्मचारी वर्ग कामावर रुजू झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रनपच्या कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे कामही सुरू झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 09-08-2024
What's Your Reaction?