रत्नागिरी : मिऱ्या येथे एमआयडीसी जबरदस्तीने लादणार नाही : पालकमंत्री उदय सामंत

Aug 26, 2024 - 10:19
Aug 26, 2024 - 10:25
 0
रत्नागिरी : मिऱ्या येथे एमआयडीसी जबरदस्तीने लादणार नाही : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मिऱ्या येथील एमआयडीसीबाबत गैरसमज पसरवले जात आहेत, नाहक घाणेरडे राजकारण केल जात असून मिऱ्यावासीयांना एमआयडीसी नको असेल तर होणार नाही, मात्र त्यांनी नेमके काय होणार आहे, हे जाणून घ्यावे. मला त्या ठिकाणी काय माझ्यासाठी ताजमहाल उभा करायचा नाही, फक्त स्थानिकांना रोजगार मिळावा हाच हेतू आहे. मात्र, रत्नागिरीत काही लोकांनी आपली बदनामी करण्याचा वीडा उचलला असल्याच्या भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.

टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड व एमआयडीसीच्या माध्यमातून कौशल्यवर्धन केंद्र उभारले जात असून, त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. शिरगाव एमआयडीसीतील स्टरलाईटच्या जागेत हे भूमिपूजन पार पडले. येत्या सहा-सात महिन्यात ट्रेनिंग सेंटर उभे राहणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. 

ते म्हणाले, रत्नागिरीतील तरुण नोकरीसाठी यापुढे बाहेर जाता कामा नये, यासाठीच आपले प्रवत्न सुरु आहेत. येत्या आठ दिवसात रत्नागिरी तालुक्यात एक हजार एकरवर प्रकल्प येत आहे. हा प्रक्षणकारी प्रकल्प नाही. यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे डिफेन्स क्लस्टरसंदर्भात नुकताच 'एमओयू' करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पही होणार आहे. त्यामुळे येथील तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध लेणार आहे. रोजगार पाहिजे असेल तर एमआयडीसी येणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मिऱ्या येथे जाकीमिऱ्या  व सडा मिऱ्या येथे औद्योगिक वसाहत

आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र तेथे नेमके काय होणार आहे हे जाणून घेण्यापूर्वीच काहीजण विरोध करीत आहेत. रोजगाराबाबत कोणी राजकारण करु नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मिऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी आमची घरे, मंदिर, मंदिराच्या जागा या औद्योगिक वसाहतीत येणार नाहीत, याची दक्षता घ्या म्हणून सांगितले. त्याप्रमाणे या सर्व गोष्टी सोडण्यात आल्या.
सडामिऱ्या व जाकीमिऱ्याच्या मोकळ्या डोंगरावर हा प्रकल्प होणार आहे. मात्र त्यातही काहीजण राजकारण आडवे आणत आहेत. मला कुणावरही जबरदस्ती करुन प्रकल्प आणायचा नाही, असे स्पष्ट करतानाच मला जागा घेऊन याठिकाणी ताजमहाल बांधायचा नाही असे उद्‌गारही ना. सामंत यांनी काढले.

विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानेच काहीजण पुढाकार घेत विरोध करीत आहेत. जे विरोध करीत आहेत, ते मिऱ्या येथील त्या जागेवर गेले होते का? असा प्रश्नही उपस्थित करीत त्यांनी नागरिकांच्या विरोधात जाऊन काम करणार नाही, असेही सांगितले. यावेळी एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, टाटा टेक्नॉलॉजीचे पुष्कराज कौलगुड, रवी राठोड, प्रितम गंजेवार, एमआयडीसचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता भांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिरगाव सरपंच फरीदा काझी, उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, परेश सावंत, शकील मोडक, वंदना खरमाले, सचिन राक्षे, वी. एन. पाटील आदी उपस्थित होते.

प्रशिक्षण केंद्रावर १९१ कोटींचा खर्च
या टाटा प्रशिक्षण सेंटरसाठी एक एकर जागा देण्यात आली असून, या ठिकाणी १९१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यात १६० कोटी टाटाकडून तर ३६ कोटी एमआयडीसीकडून निधी दिला जाणार आहे. दरवर्षी १५६० प्रशिक्षणार्थीना १७ विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पदवी, पदवीका, आयटीआय ही शैक्षणिक पात्रता त्यासाठी आवश्यक आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow