रत्नागिरी : फगरवठार येथील संरक्षक भिंत कोसळली
रत्नागिरी : शहरातील फगरवठार येथील सुहास करंदीकर यांच्या घराजवळची संरक्षक भिंत कोसळली. शनिवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास ही घटना घडली. या संरक्षक भिंतीच्या मार्गावर सुमारे १६ घरे असून गेल्याच महिन्यात दोन ठिकाणी भिंत कोसळली होती. यामध्ये एका घराच्या भिंतीवर संरक्षक भिंतीचा काहीभाग कोसळल्याने त्या कुटुंबातील व्यक्ती जखमी झाल्या.
रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठार येथे राहणाऱ्या सुहास करंदीकर यांच्या घराजवळची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र याच संरक्षक भिंतीचा काही भाग गेल्याच महिन्यात दोन ठिकाणी कोसळला होता. या परिसरात राहणाऱ्या संदेश यांच्या घरावर १५ जुलै रोजी भिंतीचा काही भाग कोसळला होता. यात काहीजण जखमी झाले.
त्यानंतर लगेचच १८ जुलै रोजी महेंद्र गावडे यांच्या घराशेजारचा संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. या घटनेसह शनिवारी घडलेल्या घटनेत कोणतीही दुखापतीची घटना घडलेली नाही. तलाठी व्ही.जी.झीटे यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 26/Aug/2024
What's Your Reaction?