रत्नागिरी : जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांचा नागपुरातील आंदोलनात सहभाग
रत्नागिरी : भारतीय मजदूर संघाशी संलम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाणा सरकारप्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी शनिवारी (ता. २४) राज्यभरातून सुमारे चार हजार वीज कंत्राटी कामगारांनी रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील कामगारही सहभागी झाले होते.
कामगार प्रतिनिधीनी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सचिन मेंगाळे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांना निवेदन देऊन मागण्यांवर कार्यवाही करावी, असे सांगितले, केंद्रीय उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष जयेंद्र धुळ, उपाध्यक्ष प्रशांत साळवी, संघटक अजित शिंदे, कार्याध्यक्ष सचिन देशमुख, चंद्रकांत गांधी, विलीन काष्ठे, सचिन कुंभार, प्रफुल्ल खैरे, केदार जोशी, अभिषेक गोरीवले, सूरज माळी, अमोल कोळंबेकर, विक्रांत मर्चडे, सागर भोगले, रूतिक डगे, रोहन दुर्गवले, सनी येलवे, मयूर महाडिक, संकेत पाटें, प्रसाद महाडिक तसेच महापारेषणकडून केंद्रीय संघटनमंत्री प्रशांत बाकाळर, गणेश चव्हाण आणि इतर कामगार गेले आहेत. या संपात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऊर्जामंत्री फडणवीस यांनी संघटनेसोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जोपर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाहीत तोपर्यंत कामगार घरी जाणार नाहीत या कामगारांनी संविधान चौकात उपोषण सुरू केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 27/Aug/2024
What's Your Reaction?