रत्नागिरी : कंत्राटी ग्रामसेवक भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी

Aug 27, 2024 - 11:43
Aug 27, 2024 - 11:47
 0
रत्नागिरी : कंत्राटी ग्रामसेवक भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी

गावतळे  : जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रियेतील संवर्ग कंत्राटी ग्रामसेवक पदभरतीचा निकाल घोषित झाला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असण्याची शंका आहे. निकाल उशिरा घोषित केल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भरती प्रक्रिया निकालाबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवक परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थीनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उत्तर पत्रिका न देणे घटना विरोधी, तसेच मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यासाठी उमेदवारांना उत्तरपत्रिका रिस्पॉन्स सीट उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश संबंधितांना द्यावेत. परीक्षार्थीच्या गुणांची पुनश्च तपासणी करावी, तोपर्यंत कोणतीही अंतरिम अथवा अंतिम निवड यादी घोषित करण्यात येऊ नये, कारण निकालात फेरफार झाले असण्याची दाट शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर योगेश पवार, श्रीनिवास सानप, हर्षा पाटील, अनिकेत शिंदे, विशाल पवार, चेतन तायडे, रंजित पवार, शहाजी दंडाळ, नशीब शहा, वृषाली खेमनास, अजिंक्य कदम, निखिल माने, संदीप भोसले, कल्याणी फडतारे आदींसह सुमारे १०४ जणांच्या सह्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow