रत्नागिरी : जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन थकीत

Sep 5, 2024 - 11:20
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन थकीत

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाने फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२४ या पाच महिन्यांचे कमिशन रास्त दराच्या (रेशन दुकान) धान्य दु‌कानदारांना दिलेले नाही. त्यामुळे दुकानदार अडचणीत आले आहेत. कमिशन देताना शासनाचा चाललेला चालढकलपणा अयोग्य आहे. त्यामुळे तातडीने कमिशन मिळाले नाही तर जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानदार धान्य वितरण बंद ठेवतील व त्याची जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिनचालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिला आहे. पाच महिन्यांचे प्रतिक्विंटल १५० प्रमाणे मिळणारे कमिशन शासनाने दुकानदारांना दिलेले नाही. 

जिल्हास्तरावर मागणी करूनही त्याची दखलही घेतली जात नाही. त्यामुळे दुकानदारांना सतत मोफत धान्य वितरण करून शासन सवंग लोकप्रियतेसाठी दुकानदारांची उपासमार करत आहे. ऐन गणेशोत्सवापर्यंत कमिशन मिळत नसल्याने दुकानदार नाराज आहेत. दुकानादारांना कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमिशनशिवाय सन २०२२च्या नोव्हेंबर-डिसेंबरचे चलन कमिशन अजूनही जिल्हा पुरवठा खात्याकडून मिळालेले नाही. त्याचप्रमाणे उडीद डाळ, एपीएल धान्य संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना, शालेय पोषण आहार यासारखी बिले शासनाने दिलेली नसून दुकानदारांची चेष्टा चालवलेली आहे. या सर्वामुळे दुकानदारांना धान्य वितरण बंदची वेळ शासनाने आणू नये, असे जिल्हाध्यक्ष कदम यांनी सांगितले.

दुकानदारांची तारेवरची कसरत
ऐन गणेशोत्सवापर्यंत कमिशन मिळत नसल्याने दुकानदार नाराज आहेत. दुकानादारांना कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमिशनशिवाय सन २०२२ च्या नोव्हेंबर-डिसेंबरचे चलन कमिशन अजूनही जिल्हा पुरवठा खात्याकडून मिळालेले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow