रत्नागिरी : शेततळे योजनेचे सव्वादोनशे प्रस्ताव तांत्रिक त्रुटींमुळे रखडले

Sep 11, 2024 - 15:08
 0
रत्नागिरी :  शेततळे योजनेचे सव्वादोनशे प्रस्ताव तांत्रिक त्रुटींमुळे रखडले

रत्नागिरी : शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपयुक्त करताना मागेल त्याला शेततळे योजना प्राधान्याने कोकणात राबविण्यात आली. मात्र, ऑनलाईन प्रस्तावित असलेल्या या योजनेबाबत शेतकरी अनभिज्ञ असताना पाठविण्यात आलेल्या प्रस्तावंपैकी सव्वादोनशे प्रस्ताव तांत्रिक त्रुटींमुळे रखडलेले आहेत.

खरीप हंगमाची चारमाही शेतीव्यतिरिक्त कोकणातही बारमीही शेती करता यावी, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे कोकणात प्राधान्याने राबविली. या योजनेअंतर्गत कोकणातील भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन शेततळ्यासाठी ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडिबिटी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, ऑनलाईन प्रस्तावाबाबत येथील शेतकरी अनभिज्ञ राहिल्याने योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला, तर शेतळ्यांसाठी पाऑविण्यात आलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ६७, रायगडमधील १०२ आण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६ प्रस्ताव रखडलेले आहेत.

योजनेंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात पाठविण्यात आलेले प्रस्ताव पावसाळ्यापूर्वी मंजूर होणे अपेक्षित असताना त्यामध्ये आधार लिंक नसणे, सात-बारावर बोजा असणे आदी कारणांमुळे कागदावरच आहे. परिणामी पावसाळा संपत आला तरी या शेततळ्यात पाण्याचे सिंचन रखडलेले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:34 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow