राजापूरात आजपासून तीन दिवस कीर्तन महोत्सव

राजापूर : शहरातील श्री मंगल कार्यालय येथे कीर्तन प्रेमींच्या वतीने शुक्रवार १८, शनिवार १९ व रविवार २० एप्रिल रोजी सांयकाळी ६.३० ते ९ या वेळात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्याची संधी उलब्ध झाली आहे. त्यामध्ये १८ रोजी ह.भ.प. महेश सरदेसाई, १९ रोजी ह.भ.प. महेश काणे व २० एप्रिल रोजी ह.भ.प. सौ.संध्या पाठक यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. बरेचदा आपण आपल्या जवळच्या देवळात रात्री च्या वेळी टाळ-मृदूंगाच्या गजरात रात्र जागवलेली अनुभवली असेलच. आनंद देणाऱ्या या कलेची व्याप्ती अशी कि आपली ब्रम्हानंदी टाळी लागलीच पाहिजे.

किर्तनात नारदीय कीर्तन , दासगणू पठडीतील किर्तन, व वारकरी किर्तन अश्या ठळक परंपरा प्रचलित आहेत त्यातील प्रामुख्याने कोकणात नारदीय किर्तन जास्त ऐकलं जातं किंबहुना कोकणातील नवोदित किर्तनकार ही याच परंपरेतील शिक्षण घेतांना दिसतांत धार्मिक कथा बरोबर समाजातील रूढी परंपरा यांचे विज्ञानानुरूप सांगड घालतांना काही वेळा अंधश्रद्धा वरही किर्तनातून प्रहार केला जातो.

सध्या समाजात वाढत चाललेली जातीय विषमता व व्यसनाधीन होत चाललेली तरूण पिढी विशेषतहा स्री पोषाखातील पाश्चिमात्याची अनुकरण करण्याची होत चाललेली चढाओढ हीच चिंतेची बाब वेगवेगळ्या माध्यमातुन कोणी ना कोणी प्रबोधन करतं असतं, किर्तन प्रेमीनी सुद्धा हाच धागा पकडून हा कीर्तन महोत्सव आयोजित केला असुन कळीकाळावर मात करण्याचे सामर्थ्य सनातन धर्म शास्त्राने, साधु संतांनी अत्यंत सोप्या साध्या भाषा शैलीत कीर्तन परंपरेच्या माध्यमातून समाजासमोर आणले आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच तरुण पिढीने हि या सुवर्णं संधीचा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक किर्तन प्रेमी यांनी केलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 18-04-2025