लांजा : लांजा शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता अधिक वेगाने होत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार किरण (भैया) सामंत यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, आता लांजा शहरातील गटार कामांना चांगलाच वेग आला आहे. आपण वाचत आहात ग्रामीण वार्ता.शहरातील गटारांची कामे जलद गतीने सुरू झाल्यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी गटारे व्यवस्थित झाल्यास पावसाचे पाणी साचून दुकानांमध्ये किंवा रस्त्यावर येण्याची समस्या टळेल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत.
आमदार किरण सामंत यांनी वेळोवेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले आहे.
लांजा शहरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. सध्या सुरू असलेल्या गतीमुळे हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 21-04-2025
