संगमेश्वरात महामार्गाची दैनावस्था; अर्धवट कामामुळे प्रवाशांचे हाल

Jun 24, 2024 - 14:10
Jun 24, 2024 - 14:13
 0
संगमेश्वरात महामार्गाची दैनावस्था; अर्धवट कामामुळे प्रवाशांचे हाल

माखजन : मुंबई-गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेषतः संगमेश्वर तालुक्यातील अर्धवट कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन आहे. धामणी, संगमेश्वर, पैसाफंडच्या समोर, सोनगिरी आदी सगळ्याच भागात रस्त्याची चाळण झाली आहे. दुरवस्था झालेल्या ठिकाणी प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पावसाचे पाणी, चिखल यामुळे खड्डाची खोली वाहन चालकाला कडून न आल्याने गाड्या आपटण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय रस्त्यावर असलेला चिखल यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्याच अपघातांची नोंद जरी प्रत्यक्षात होत नसली तरी या साऱ्यांना शारीरिक त्रास व वाहनांची होणारी मोडतोड यामुळे वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत, रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईडपट्टीची माती
अनेक ठिकाणी वाहून रस्त्यावर आली आहे. काही ठिकाणी साईडपट्टीमध्ये गाड्या रुतत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर चक्क पाणी वाहत आहे.

गेली दहा वर्षे हा रस्ता पूर्ण होईल, अशा आशेवर असणाऱ्याा कोकणवासीयांना पावसाळ्यात या त्रासाला नाहक समोरे जावे लागत आहे. संथगतीने सुरू असलेले काम आणी प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच हे चित्र सध्या संगमेश्वर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवात होणार बिकट अवस्था
संगमेश्वरातील या रस्त्याची दैनावस्था अशीच राहिली तर गणेशोत्सवापर्यंत रस्ता वाहतुकीस देखील निरुपयोगी होईल, अशी स्थिती आहे. चाकरमान्याची अवस्था बिकट होईल. याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow