चिपळूण : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश नको; पुरोगामी कार्यकर्त्यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व तत्सम विषमता प्रसारक साहित्याचा समावेश करू नये व तो रद्द करावा, या मागणीसाठी चिपळुणातील पुरोगामी कार्यकत्यांनी येथील प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले व शालेय अभ्यासक्रमातील समावेश रद्द करावा, अशी मागणी केली.
यावेळी दिलेल्या निवेदनानुसार, पुरोगामी विचारवंतांनी व अनेक राज्यकर्त्यांनी विषमता नाकारली आहे. घटनेने आणि कायद्याने देशात सामाजिक समतेची व समानतेची भूमिका मान्य केली आहे. शिक्षणात मनुस्मृती आणून राज्य सरकार विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी काँग्रेसचे भरत लब्धे, विनायक होमकळस, सुनील खेडेकर, पाथरे, इंदूलकर यांसह अन्य उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 01/Jul/2024
What's Your Reaction?