रत्नागिरीकरांनी सुरु केलेल्या या अनोख्या भिशीचे सर्वत्र होतंय कौतुक

Jul 8, 2024 - 18:43
 0
रत्नागिरीकरांनी सुरु केलेल्या या अनोख्या भिशीचे सर्वत्र होतंय कौतुक

आजवर आपण सोन्याच्या अथवा पैशाच्या भिशी बाबत ऐकलं असेल. मात्र रत्नागिरीतील काही वृक्षप्रेमी नागरिकांनी एकत्र येत आता वृक्ष भिशी सुरु केलीय. यासाठी सुमारे ५० हून अधिक नागरिक एकत्र आलेत. दर महिना प्रत्येकी २०० रुपये वर्गणी घेऊन लकी ड्रो पद्धतीने विजेता काढून त्याला वृक्षारोपणाची संधी दिली जातेय. वृक्ष स्नेहसंवर्धन असं या भिशी ग्रुपच नाव आहे. हि अभिनव संकल्पना अनेकांना आवडली आहे आणि त्यामुळेच अनेक नागरिक या भिशीत सहभागी होतायत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow