रत्नागिरी : पूरस्थितीमुळे एसटीच्या ७०० फेऱ्या कराव्या लागल्या रद्द
रत्नागिरी : मुसळधार पाऊस, नद्यांना आलेला पूर आणि शाळा-महाविद्यालयांना सुटी यामुळे जिल्ह्यात एसटीच्या सुमारे ७०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे एसटी विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अन्य जिल्ह्यांतही पावसाचा जोर असल्यामुळे लांब पल्ल्याच्या फेऱ्या संबंधित आगारांकडून माहिती घेऊन करून सोडण्यात आल्या.
सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत एसटीच्या ४०५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये मंडणगड २०, दापोली ३० फेऱ्या, खेड ३२, चिपळूण ९२, गुहागर ५८, देवरूख ५९, रत्नागिरी शहर ९, ग्रामीण १०, लांजा २४, राजापूर ७१ एवढ्या फेऱ्या रद्द झाल्या. या फेऱ्यांचे ११ हजार ८७२ किमी रद्द झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 09-07-2024
What's Your Reaction?