लांजात नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात
लांजा : गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील काही भागांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यानंतर सोमवार दि. ८ जुलै रोजी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महसूल विभागातर्फे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत.
पावसामुळे वाटूळ-दाभोळे मार्गावरील भांबेड येथील भाई जोशी यांच्या घरामध्ये पाणी भरले होते. गटारातील पाण्याची व्यवस्था ठेकेदारांनी व्यवस्थित पूर्ण न केल्यामुळे त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे, अशी खंत सर्वत्र आढळली आहे. तसेच मुंबई-गोवा हा हायवे महामार्गाजवळील देवधे येथील साईटपट्टी रस्ता खचला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महसूल विभागातर्फे पंचनामे सुरु आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 10-07-2024
What's Your Reaction?