पावसमध्ये घराची भिंत कोसळली
पावस : गेले तीन-चार देवस सतत पडणाऱ्या पावसाने पावस परिसरात विश्रांती घेतल्यामुळे ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे पावस येोल श्रीमती रोहिणी मारुती विलणकर यांच्या घराची भिंत कोसळल्याने ३० हजारांचे नुकसान झाले आहे; मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावस परिसरामध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत होता. बुधवारी (ता. १०) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. दुपारी चांगले ऊन पडले. मुसळधार पावसाने लावणीच्या कामाने वेग घेतला आहे.
परिसरामध्ये ६० टक्केपेक्षा जास्त लावणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. पावस मंडळात ६७ आणि फणसोप मंडळात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावस येथील श्रीमती रोहिणी मारुती विलणकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा करून भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 11/Jul/2024
What's Your Reaction?