कुर्धे येथील 'त्या' धोकादायक साकवाची तहसीलदारांकडून पाहणी
पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे गावातील नदीवरील लोखंडी साकव धोकादायक झाल्याचे होताच तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थिती समजावून घेतली. कुर्धे गावातील नदीवर येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार, ओंकार अभ्यंकर यांच्या घराजवळ लोखंडी साकव बांधण्यात आला. त्यामुळे खोताचीवाडी, फडकेवाडी आदी परिसरातील शालेय विद्यार्थी यांना प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळाकडे जाण्यासाठी त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी पावसाळ्यामध्ये या लोखंडी साकवाचा चांगला उपयोग होत होता. चार वर्षांपूर्वी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती.
परंतु त्यानंतर त्या लोखंडी साकवाचा मधील भाग गंजल्यामुळे मोडकळीस आला आहे. त्यामुळे तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाला आहे. होते. त्याची दखल घेत तहसीलदार राजाराम म्हात्रे, तलाठी श्रीमती मनीषा कदम, उपसरपंच श्रीमती शिंदे, पोलिस अंमलदार महेश कुबडे यांनी ग्रामस्यांसमवेत पुलाची पाहणी केली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. सध्या लोखंडी साठवाची तातडीने दुरुस्ती करणे पावसाळ्यामुळे शक्य नसल्याने तात्पुरत चांगल्या प्रकारचे दोर बांधून वाहतूक सुरू राहील या दृष्टीने आदेश देण्यात आले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 11/Jul/2024
What's Your Reaction?