आयटीआय ते पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवाक्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थीना १२वी पास ६ हजार, आयटीआय किंवा पदविका ८ हजार रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर यांना १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाने याबाबतचा शासननिर्णय काल प्रकाशित केला आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर असाची. शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेलापात्र असणार नाहीत तसेच उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी, आधार नोंदणी, बँकखाते आधार संलग्न असणे अपेक्षित आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. आस्थापना किंवा उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना किमान ३ वर्षापूर्वीची असावी, प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने राहील. या कालावधीत उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 11/Jul/2024
What's Your Reaction?