रत्नागिरी : जिल्ह्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार
रत्नागिरी : सोमवार, मंगळवारी झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी आणि गुरुवारीही ओसरला होता. मात्र, कोकण किनारपट्टी भागात शुक्रवारपासून पाऊस हलक्या ते मध्यम सरींच्या स्वरूपात पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या आठवड्याची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. मात्र, बुधवारपासून पावसाची धार कमजोर झाली. गेले दोन दिवस किरकोळ सरींचा अपवाद वगळता पावसाने जवळपास सुट्टी घेतली. गुरुवारीही पाऊस रोडावलेला होता. सकाळपासूनच उघडीप घेत कडक उन्हाने दिवसाची सुरवात कोरडी झाली.
दरम्यान बुधवारी सकाळी आठ ते गुरुवारी सकाळी आठ या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात २७ मि. मी. च्या सरासरीने २४३.५० मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी ३० मि. मी. पावसाची नोंद झाली. दापोली आणि रत्नागिरी या दोन तालुक्यात २० मि.मी. पवसाची नोंद झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 12-07-2024
What's Your Reaction?