रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीवर बाबू पाटील यांची नियुक्ती
रत्नागिरी : माजी जि.प. सदस्य आणि शिवसेनेचे पदाधिकारी प्रसाद ऊर्फ बाबू पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. वाटद-खंडाळा परिसरातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत जायंट किलर ठरून निवडून आलेले माजी जि.प. सदस्य प्रसाद ऊर्फ बाबू पाटील हे मागील काही वर्षे सातत्याने सामाजिक कामात अग्रेसर आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी गतवर्षी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या भागातील ग्रामस्थांचे अनेक प्रश्न सातत्याने त्यांनी हाताळले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्याची शिफारस अर्थमंत्र्यांकडे केली होती.
पालकमंत्र्यांनी केलेली मागणी मान्य झाल्यानंतर प्रसाद उर्फ बाबू पाटील यांची निवड जिल्हा नियोजन समितीवर झाली आहे. आगामी दोन महिन्यात जिल्हा नियोजनच्या माध्यमातून वाटद जिल्हा परिषद गटातील अनेक विकास कामे करण्याचा मानस बाबू पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 12/Jul/2024
What's Your Reaction?