राजीवडा येथे ३२ जणांच्या नावे कर्ज काढून केली २९ लाखांची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Jul 18, 2024 - 10:35
 0
राजीवडा येथे ३२ जणांच्या नावे कर्ज काढून केली २९ लाखांची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

रत्नागिरी : स्वतःच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांतून ३२ जणांच्या नावे कर्ज काढून, त्यांची तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फसवणुकीची ही घटना जानेवारी २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत राजीवडा येथे घडली आहे. याप्रकरणी इमरान यासीन वस्ता, फरहत इमरान वस्ता (दोन्ही रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) या दाम्पत्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात हानिफा साजिद मिरकर (३५, रा. राजीवडा पुलाजवळ, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, या दाम्पत्याने फिर्यादींसह अन्य ३१ जणांना एकत्र करुन त्यांचे वेगवेगळे गट तयार केले. त्यानंतर २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत आपल्या मुलीच्या लग्नासाठी तसेच न्यायालयात खटला सुरु असल्याचे कारण सांगत या ३२ जणांना वेगवेगळ्या वित्तीय कंपनीत नऊन त्यांच्या नावे कर्ज काढून ते स्वतः घेतले. दरम्यान, घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त पैसे तुम्हाला देण्यात येतील, असे आमिषही त्यांना या दाम्पत्याकडून दाखवण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यांनी कर्ज घेतलेली रक्कम परत न करता ३२ जणांची एकूण २८ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow