रत्नागिरीत खड्ड्यांपाठोपाठ मोकाट गुरांचीही डोकेदुखी; अपघातांचा धोका वाढला
रत्नागिरी : पावसाने उसंत घेण्यास सुरुवात केल्यानंतर मोकाट गुरे पुन्हा रत्नागिरी शहरातील रस्त्याच्या मधोमध येऊ लागली आहेत. गेला आठवडाभर जोरदार पाऊस होता तेव्हा ही गुरे रस्त्यावर न येता कुठेतरी आडोशाला थांबत होती.
मुसळधार पावसामुळे आणि सतत वाहनांची होणारी वाहतूक यामुळे रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मंगळवारपासून पाऊस कमी झाल्यानंतर खड्डे भरण्याचे काम तसेच पसरलेली खडी, रेती बाजूला करण्याचे काम सुरू झाले आहे. अशा धोकादायक रस्त्यांमध्ये आता गुरे येऊन बसू लागली आहेत. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेची खड्यांपाठोपाठ मोकाट गुरांची डोकेदुखी सुरू झाली आहे. या मोकाट गुरांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळेस ही गुरे दिसून येत नसल्याने त्यांच्यावर वाहने धडकण्याचे प्रकार घडून येत आहेत. तसेच रस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही होत आहे. शहरातील घरे, सोसायट्यांमध्ये शिरून ही गुरे झाडे फस्त करत आहेत. यामुळे नुकसानदेखील होत असल्याने या गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 18/Jul/2024
What's Your Reaction?