आधार केंद्रातील समस्या सोडवा; संगमेश्वरवासीयांची मागणी
संगमेश्वर : आधार केंद्रातील समस्या सोडवण्यासाठी संगमेश्वरमधील व्यापारी संघटनांसह सर्व नागरिक एकवटले होते. येथे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवा अणि त्यावर ठोस निर्णय घ्या, अशी मागणी माभळे येथील आधार केंद्राच्या कार्यालयात जाऊन नागरिकांनी केली.
लोकांना कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात आधारकार्ड अपडेट व इतर संबंधित गोष्टी करून द्याव्यात, असे नागरिकांनी सांगितले, संगमेश्वर नावडी आधार केंद्र काही कारणास्तव बंद आहे. ते लवकरच चालू करून घेण्यासाठी कार्यवाही करावी, असे यावेळी सांगण्यात आले. पोस्ट कार्यालयामध्ये आधार केंद्र चालू करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले, लोकांना आपले अधिकार काय आहेत, हे वेळोवेळी सांगून त्यांना जागृत केले पाहिजे. सर्वजण एकत्र आले तर शहराच्या समस्या लवकरच सुटू शकतील, असे यावेळी उदय संसारे, दादा कोळवणकर यांनी सांगितले. याप्रसंगी विवेक शेरे, रिंकू कोळवणकर, दिलीप रहाटे, दादू भिंगार्डे, स्वप्नील नारकर, संतोष खातू, नील खातू, पिंका खातू, सयाजी हळदणकर, वैभव मुरकर, शेखर पेणकर, पंकज कोकाटे, बंडया' शेट्ये, राजू आंबवकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 20/Jul/2024
What's Your Reaction?