सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याबाबत रत्नागिरी पोलिसांचे आवाहन

Jul 20, 2024 - 12:38
 0
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याबाबत रत्नागिरी पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी : अलीकडे विशाळगड (जि. कोल्हापूर) येथील घटनांच्या अनुषंगाने सोशल मीडियावर पसरत असलेल्या वेगवेगळ्या पोस्टच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांद्वारे सर्व नागरिकांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह दृश्य, फोटो, व्हिडिओ तसेच अफवा न पसरविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर सायबर पोलीस ठाणे व सोशल मीडीया लॅब मार्फत दिवसाचे २४ तास निगराणी ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडीओ प्रसारित केल्यास रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अथवा बळी पडू नये. सोशल मीडियावर कोणत्याही धर्माबद्दल अफवा पसरविल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची दक्षता घ्यावी.

फेसबुक, व्हॉटसॲप, ट्विटर (एक्स), इन्ट्राग्राम, यूट्युबच्या माध्यमातून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश आक्षेपार्ह संदेश अथवा व्हिडीओ प्रसारित करण्यात येऊ नयेत. सर्व जाती, धर्माच्या संदर्भात आक्षेपार्ह घटनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा घटनांवर रत्नागिरी पोलीस दलातर्फे कडक धोरण स्वीकारले जाईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:07 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow