रत्नागिरी : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

Jul 24, 2024 - 17:06
Jul 24, 2024 - 17:08
 0
रत्नागिरी : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : सामाजिक न्याय विभागाकडून अनु.जाती व नवबौध्द घटकांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून देण्याकरिता दि. १४ ऑगस्ट २०१८ च्या शासननिर्णयानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. तरी इच्छुक पात्र अर्जदाराने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव, रत्नागिरी यांच्याकडे अटींची पूर्तता करणारे पुरावे / कागदपत्रासह संपर्क साधून अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

लाभाचे स्वरुप :- 
या योजनेअंतर्गत अनु.जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमीहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ४ एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंमत कमाल रु.५ लाख प्रती एकर किंवा २ एकर ओलीताखालील (बागायती जमीन किंमत कमाल रु.८ लाख प्रती एकर

लाभार्थी निवडीचे निकष :-
लाभार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकातील असावा. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील भूमीहीन असावा. लाभार्थीचे किमान वय १८ ते ६० वर्षे असावे. 

निवडीचे प्राधान्यक्रम :-
दारिद्रय रेषेखालील भूमीहीन परित्यक्त्या स्त्रिया. दारिद्रय रेषेखालील भूमीहीन विधवा स्त्रिया. अनु.जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत अनु.जातीचे अत्याचारग्रस्त.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:34 PM 24/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow