गावखडी येथे विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथील शेतातील विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार २२ जुलै रोजी दुपारी ३ ते रात्री ८ वा. कालावधीत घडली आहे. शरद देऊ पाटील (५६, रा. गावखडी भंडारवाडी, रत्नागिरी) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास ते गावातील शेतात खतपाणी करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांना शोधण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शरद पाटील हे शेतातील विहिरीच्या पाण्यात पालथ्या स्थितीत तरंगताना दिसून आले. त्यांना काठीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले असता ते कोणतीही हालचाल न करता थंड पडलेल्या अवस्थेत होते. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 25-07-2024
What's Your Reaction?