रत्नागिरीला तीन दिवसाचा पावसाचा 'यलो अलर्ट'
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागात पावसाने उसंत घेत मंगळवारी उघडीपही घेतली. सोमवारी रात्री काही भगात जोरदार सरी झाल्या. मंगळवारी काही भागात हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप घेतली. यावेळी काहिकाळ ऊन ही पडले होते.
दरम्यान सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ या संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात केवळ २८.८३ मि.मीच्या सरासरीने एकूण २५९.५० मि.मी. पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मि.मी. पाऊस होतो. त्यापैकी ७५ टक्के प्रवास पावसाने जुलै अखेरीस पुर्ण केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन पावसाळी महिन्यात जिल्ह्यात संपुर्ण पाऊस हंगामातील अडीच हजार मि. मी.ची सरासरी पूर्ण केली आहे. संपर्ण जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने साडे बावीस हजार मि.मी. ची एकूण मजल मारली आहे. गतवर्षी या कालावधीत पावसाने वीस हजार मि.मी. टप्पाही गाठला नव्हता. गतर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाने आतापर्यंत साडेतीनशे मि.मी.ची आघाडी घेतली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद आतापर्यंत खेड तालुक्यात झाली असून, गुहागर तालुक्यात पाऊस सर्वात कमी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 31-07-2024
What's Your Reaction?