रत्नागिरी : जयगड किल्ला येथील श्रीगणेश मंदिर आणि श्रीहनुमान मंदिर यांचे मुसळधार पावसात मोठे नुकसान; तत्काळ दुरुस्तीची केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे मागणी

Aug 1, 2024 - 13:57
 0
रत्नागिरी : जयगड किल्ला येथील श्रीगणेश मंदिर आणि श्रीहनुमान मंदिर यांचे मुसळधार पावसात मोठे नुकसान; तत्काळ दुरुस्तीची केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे मागणी

रत्नागिरी : जयगड किल्ला येथील पुरातन ठेवा असलेले श्रीगणेश मंदिर आणि श्रीहनुमान मंदिर यांचे कालच्या मुसळधार पावसात खूप नुकसान झाले आहे. या मंदिराचे छप्पर नष्ट झाले आहे. 

हे पुरातन मंदिर आणि जयगड किल्ला केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधीन असून त्यांच्या देखभालीखाली आहे. जयगड भागातील नागरिकांचे हे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधीन असल्यामुळे या मंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी ही संस्था जबाबदार आहे. जयगड येथील जागरूक नागरिक श्री. प्रमोद घाटगे आणि अनिरुद्ध साळवी यांनी सदर विषय संबंधित केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना कळविला आहे. लवकरात लवकर सदर मंदिराची दुरुस्ती करून त्या अगोदर तात्काळ या मंदिरावर आच्छादन घालून आतील मूर्तींचे व रचनेचे संरक्षण केले पाहिजे. यासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow