खानवली-रत्नागिरी एसटी बसला अपघात
पावस : वस्तीच्या खानवली ते रत्नागिरी या एस. टी. बसला पावस भक्तनिवासाजवळ असलेल्या गतिरोधकाजवळ अपघात झाला. गर्दीने भरलेल्या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी बचावले आहेत.
सकाळी सातच्या सुमारास खानवली रत्नागिरी ही वस्तीची गाडी (एम. एच. १४ बी. टी. २६८५) ही शालेय विद्यार्थी व प्रवासी जनता यांना घेऊन मार्गस्थ झाली असताना पावस भक्तनिवासजवळ असलेल्या गतिरोधकाला वाचवत असताना गाडीमध्ये ६० प्रवासी प्रवास करत असताना गतिरोधकाजवळ गाडी आदळू नये, याकरिता ड्रायव्हर साईडने नेत असताना गाडीवर ताबा न राहिल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला गेली सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या सिमेंटच्या खांबाला धक्का लागून गाडी चिखलामध्ये थांबली त्यामुळे प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. त्यानंतर प्रवासी दुसऱ्या गाडीने मार्गस्थ झाले. ही एसटी लांजा डेपोची होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 05/Aug/2024
What's Your Reaction?