रत्नागिरी : भातरोपाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे कृषी विभागाकडून आवाहन

Aug 8, 2024 - 12:23
 0
रत्नागिरी : भातरोपाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे कृषी विभागाकडून आवाहन

रत्नागिरी : जूननंतर जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठल्याने जिल्ह्यातील खरिपाचा हंगाम पेरणीच्या टप्प्यावर समाधानकारक झाला असला तरी आता ऑगस्ट महिन्यात पावसाच्या सातत्याने भातरोपाच्या वाढीसाठी खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.

जून-जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून, आतापर्यंत पावसाने अडीच हजार मि. मी. ची सरासरी गाटली आहे. यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत गतवर्षाच्या तुलनेने १२ टक्के पाऊस अतिरिक्त झाला आहे. मात्र, ऐन खरीपात बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

आता श्रावणसरींनी पिकाचा ताबा घेतला आहे. पाऊस उसंत घेत सुरू असल्याने मळभाच्या वातावरणात कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक असतो. तसेच भात खाचरातील पाणी सातत्याने निचरा होणे आवश्यक असते. अन्यथा मुळाशी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन फलावरही रोगाचा प्रभाव वाढू शकता.

पिकासंदर्भातील ही स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी सातत्याने पीक पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक त्या खतांच्या आणि फवारण्याची माहिती कृषी विभागाच्या सल्ल्याने हाती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow