पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे ८२ कोटींचे नुकसान
रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या जिल्ह्याला २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना घडल्या.
१ जून ते १८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात झालेले नुकसान
- मृत्युची संख्या : ४
- जखमी व्यक्ती : ७
- घरे : ३३६
- गोठे : ५२
- सार्वजनिक मालमत्ता : ५८
- खासगी मालमत्ता : ४०
- मृत जनावरे : ११
- दुकाने : ४७२
- पुरामुळे स्थलांतर : ७३ कुटुंबातील ३०७ व्यक्ती
- दरडीमुळे स्थलांतर : ४ कुटुंबातील ११ व्यक्ती
- अंदाजे एकूण नुकसान : ८२,०५,७३,१८९ रुपये
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:23 19-07-2024
What's Your Reaction?