गोवंश हत्या प्रकरण : आरोपीच्या जामीन रद्दसाठी पोलिसांचे जिल्हा न्यायालयात अपील
रत्नागिरी : गोवंश हत्या प्रकरणातील आरोपी शादाब बलबले याचा जामीन रद्द व्हावा, यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे अपील जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहे. याप्रकरणी दि. १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
शहरानजीकच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये कोकण रेल्वे कॉलनी मार्गावर गोवंशीय प्राण्याची कापलेली मान आढळून आली होती. याप्रकरणातील शहर परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी क्रांतीनगर येथील शादाब बलबले याला अटक केली. दोन वेळच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.
सुनावणीच्या वेळी ग्रामीण पोलिसांनी आरोपीला जामीन न देता न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली होती. गोवंश हत्येप्रकरणी आरोपी अटक असताना झालेल्या तपासात त्याने वेतोशी येथे बेकायदेशीरपणे गुरे पाळली असल्याचे समजले. पोलिसांनी हा दुसरा गुन्हा दाखल केला. यामध्ये त्याला अटकपूर्व ग्रामीण मंजूर झाला आहे. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्याचा पहिल्या गुन्ह्यातील जामीन रद्द व्हावा, यासाठी जिल्हा न्यायालयात अपील केले होते. याप्रकरणी आता १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. जामीन का रद्द करू नये, याबाबतची नोटीसही आरोपीला देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 10-08-2024
What's Your Reaction?