प्रख्यात अभिनेते विजय कदम यांचं निधन
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मराठी सिनेमा मालिका आणि रंगभूमी गाजवणारे हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे.
गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराची झुंज देत होते. पण त्यांच्यावरील उपचार यशस्वी ठरले. आणि अखेर आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमी येथे आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.
विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा गंधार आहे. मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांना खंबीर साथ दिली असे सांगितले होते. विजय कदम यांच्यावर चार किमोथेरपी आणि दोन सर्जरी झाल्या होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 10-08-2024
What's Your Reaction?