सात महिन्यात रत्नागिरी एसटी विभागाला ३४ कोटी ८४ लाखाचे उत्पन्न
रत्नागिरी : शासनाच्या महिला सन्मान योजनेचा मोठा फायदा एसटी विभागाला झाला आहे. सात महिन्यात १ कोटी ८४ लाख ९२ हजार महिलांनी एसटीने प्रवास केला आहे. यातून रत्नागिरी एसटी विभागाला ३४ कोटी ८४ लाख ९४ हजार १७४ रुपये उत्पन्न मिळाले आहे. शासकीय योजनांमुळे एसटीला चांगले दिवस आल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.
महिला सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्रात एसटीने कुठेही एसटी प्रवास करण्यासाठी तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे देवदर्शन, पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. महिला सन्मान योजनेंतर्गत एसटीच्या कोणत्याही बसमधून प्रवास करणे सुलभ झाले आहे. महिला सन्मान योजनामुळे प्रवासी संख्येत आणि एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
महिला सन्मान योजना मार्च २०२३ ला सुरू झाली. तिकीटदरात ५० टक्के सवलत असल्याने महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्यात रत्नागिरी एसटी विभागात १ कोटी ८४ लाख ९२ हजार महिलांनी प्रवास केला.
शासनाने १७ मार्च २०२३ पासून महिलांसाठी महिला सन्मान योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत महिलांना राज्यभरात एसटीतून कुठेही निम्म्या तिकिटात प्रवास करणे सुलभ झाले आहे. देवदर्शन, पर्यटनासाठी महिला बाहेर पडल्या आहेत. महिला प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात वाढ झाली आहे. –प्रज्ञेश बोरसे, एसटी विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 19-08-2024
What's Your Reaction?