मुंबई-गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला आहे : संजय राऊत
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून शिवसेना नेते रामदास कदम, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावर बोलताना टीका करत संजय राऊत यांनी मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला असल्याचे म्हटले आहे.
मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला आहे
मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला आहे. ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे. पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम खात, नगर विकास खात या शिंदे गटाच्या एटीएम मशीन बनलेल्या आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच सरकार हे पैशाच्या मागे लागलेले आहे. हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा त्यांच्या मारामाऱ्या होतील. एकमेकांच्या जागा पाडल्या जातील. जागावाटपावरुन खून खराबा होऊ एवढीच आमची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 20-08-2024
What's Your Reaction?