राजापुरात आज बाजारपेठ बंद न ठेवता काळ्या फिती लावून निषेध करणार
राजापूर : बदलापूर येथील घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच विरोधी महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार, दि. २४ ऑगस्ट ला राज्य बंदची हाक दिली असताना त्या पार्श्वभूमीवर राजापूर शहरातील समस्त व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद न ठेवता हाताला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यासाठी राजापूर तहसीलदार आणि पोलिस ठाणे यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय समस्त व्यापारी संघाने घेतला आहे. तर राजापूर तालुक्यातील रिक्षा चालक-मालक संघटना आणि रिक्षा सेनेने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राजापूर तालुका व्यापारी संघाची याबाबत बैठक पार पडली आणि त्यामध्ये झालेल्या घटनेवर चर्चा करण्यात आली. त्या घटनेचा जोरदार निषेध करण्यात करताना संबंधीत आरोपीला कठोरात कठोर शासन हे झालेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वा. राजापूर तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने निवेदने सादर केली जाणार आहेत.
राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी आयोजीत बंदबाबत व्यापारी संघाची भूमिका स्पष्ट केली. राजापूर तालुका व्यापारी संघाने शनिवारच्या बंद बाबत आपली भूमिका स्पष्ट केली, तर राजापूर तालुका रिक्षा चालक-मालक संघटना व रिक्षा सेनेच्या वतीने शनिवारच्या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या विविध भागातील रिक्षा चालक- मालकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रिक्षा चालक-मालक संघटना व रिक्षा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 24-08-2024
What's Your Reaction?