लांजातील घनकचरा प्रकल्प रद्द करण्याची मागणी
लांजा : शहरातील घनकचरा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड यांनी केले असून, याबाबतचे पत्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना देण्यात आले आहे.
अविनाश लाड यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी येथे लांजा नगर पंचायतीकडून भर वस्तीजवळ डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यामुळे येथील रहिवासी यांनी काँग्रेस पक्षाकडे डम्पिंग ग्राऊंडबाबत तक्रार केली आहे. ही जागा लोकवस्तीजवळ असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो आहे. जिल्हा निवड समितीने ही जागा घेण्यास विरोध दर्शवला होता. त्याप्रमाणे ही जागा न्यायप्रविष्ठ असतानासुद्धा नगरपंचायतीकडून खरेदी करण्यात आलेली आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लाड यांनी या पत्राद्वारे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 26/Aug/2024
What's Your Reaction?