कोकण किनाररपट्टी भागात पावसाचा जोर ओसरला
रत्नागिरी : सक्रीय झालेल्या कमी दाबाचा प्रभाव बाष्प आकुंचन पावल्याने जोरदार पावसाला कोकण किनाररपट्टी भागात ब्रेक लागला आहे. ही वातावरणीय स्थिती काही तासातच बदलण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी भागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदर्ग या जिल्ह्यात जोदार पवासचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात ३२.६७ मि.मी. च्या सरासरीने दिवसबरात २९४ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. कोकण किनारपट्टी भागात सोमवार, मंगळवार सलग दोन दिवस जोरदार सातत्य राखल्यानंतर बुधवारी पाऊस पुन्हा कमजोर झाला. मात्र पुढील २४ तासांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी संपलेल्या २४ तसात मंडणगड तालुक्यात ३०.६०, दापोली २७.४०, खेड ४५.४०, - गुहागर २२.१०, चिपळूण ३१, संगमेश्वर ३१.७०, रत्नागिरी २०.५०, लांजा ४१.८०, राजापूर तालुक्यात ३६.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 29-08-2024
What's Your Reaction?