रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश

Sep 6, 2024 - 10:18
 0
रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश


रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. ६ सप्टेंबर रोजी ००.०१ वाजल्यापासून ते दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी २४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई- गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तसेच ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेशोत्सव व ईद-ए- मिलाद हे सण साजरा करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ नुसार कारवाई करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow