राजापूर : पाचल बाजारपेठेतील खड्ढे न भरल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा
पाचल : ओणी-पाचल अणुस्कुरा मार्गावरील पाचल बाजारपेठेतील खड्ढे येत्या चार दिवसांत तातडीने न भरल्यास आपण सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय राजापूर येथे उपोषण करण्याचा इशारा तुषार पाचलकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी, उपअभियंता, तहसीलदार, पोलिस निरीक्षक राजापूर यांना दिले आहे. पाचल ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, येथे ग्राहकांची नेहमीच गर्दी असते, तसेच वाहनांचीही मोठी वर्दळ असते, मात्र, गणेशोत्सवापूर्वी पाचल बाजारपेठेतील खड्ढे भरले नसल्याने बाजारपेठेत खकुांचे साम्राज्य असून हा रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे. श्री गणेशोत्सवासाठी पाचल विभागात आलेल्या हजारी चाकरमान्यांनी बांधकाम विभागाच्या या दिसाल व नियोजनशून्य कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर कार्यालयासमोर उपोषण करण्याचे लेखी निवेदन पाचलकर यांनी प्रशासनाला दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 9/9/2024
What's Your Reaction?