चुकीच्या कामांमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला विलंब : रवींद्र चव्हाण

Sep 9, 2024 - 15:15
 0
चुकीच्या कामांमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला विलंब : रवींद्र चव्हाण

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत आहे. या कामाचे १० टप्पे असून त्यासाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमले आहेत. काही चुकीच्या कामामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. या महामार्गाचे काम पूर्ण होण्यास कालावधी लागेल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सार्वजनिक बांधकाम विभागावर सर्वच स्तरांतून टीका होत असताना चव्हाण यांनी या महामार्गाच्या दुरवस्थेस राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण जबाबदार असल्याचे सांगितले. या महामार्गावरील राजापूर ते गोवापर्यंतचा महामार्ग चांगला झाला असून संगमेश्वर ते राजापूर दरम्यानचे काम रखडले आहे. या महामार्गावर छोटे-मोठे १४ पूल आहेत. तसेच या रस्त्याला अनेक सेवा रस्ते आहेत. यामुळेच कामाला विलंब होत आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. या ठिकाणी दुसरे कंत्राटदार नेमण्यात आले. त्यांनीही काम केलेले नाही. उपठेकेदार काम करत नसल्याने हा गोंधळ झाला आहे. तसेच या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्याच्या बांधकाम विभागाला नाहीत. केवळ देखरेख करण्याची जबाबदारी आहे. तरीही लवकर हे काम पूर्ण करून घेतले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:43 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow