पुन्हा सीएनजी तुटवडा निर्माण झाल्यास गाठ माझ्याशी आहे...किरण सामंतांनी भरला दम
रत्नागिरी : रत्नागिरी, लांजा, राजापूर आदी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर सीएनजी तुटवडा असल्याचे दिसत आहे. सीएनजी पंपावर गॅसचा पुरवठा कमी झाल्याने रिक्षा चालक व वाहनधारक यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. रिक्षा व्यावसायिकांचे तर हातावर पोट आहे. या परिस्थितीची दखल घेत शिवसेनेचे किरण सामंत यांनी लांजा सीएनजी पंपावर जात चांगलाच दम भरला आहे.
सीएनजी कंपनी सोबत थेट बोलत त्यांना चांगलेच सुनावले आहे. यापुढे सीएनजी तुटवडा निर्माण झाल्यास गाठ माझ्याशी आहे असा दमच किरण सामंत यांनी भरला आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व सीएनजी पंपात प्रथम टँकर आला पाहिजे. येथील गरज पूर्ण करूनच मग काय ते बाहेर पाठवा असे किरण सामंत यांनी कंपनीला सांगितले आहे. त्यामुळे आता सर्व पंपावर सीएनजी पुरवठा व्यवस्थित होईल, असे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 12-09-2024
What's Your Reaction?