लांजा कोल्हेवाडी येथे शेताच्या बांधावरून भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप...
रत्नागिरी : जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ३३४ घरगुती गणपतीचं विसर्जन बुधवारी झाले.
गौरी सोबत गणरायाच्या विसर्जनाची कोकणातील परंपरा आहे. लांजा तालुक्यातील कोल्हेवाडी गावात शेताच्या बांधावरून विसर्जनासाठी ग्रामस्थ बाप्पाला वाजत गाजत ढोल, ताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पा मोरया...असा जयघोष करत घेऊन जातात. आमच्या शेतीचे गणरायाकडून रक्षण व्हावे, अशी ग्रामस्थांची भावना असते. जड अंत:करणाने, भक्तीमय वातावरणात ग्रामस्थ व चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 13-09-2024
What's Your Reaction?