चिपळूण आगारातून जादा अडीचशे बसेसचे बुकिंग
चिपळूण : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चिपळूण आगार प्रशासन सज्ज झाले आहे. पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यासाठी चिपळूण आगारातील अडीचशे जादा बसेसचे बुकिंग झाले आहे. प्रवाशांची गैयसोय टाळण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांसह वाहतूक कक्ष देखील उभारला जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणेसह विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी चिपळूण तालुक्यात दाखल झाले आहेत. यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाच दिवसाच्या गणरायाचे विजर्सन होताच बहुसंख्य चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघतात. यादृष्टीने जादा वाहतुकीसाठी आगार प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत २५० जादा गाड्यांचे बुकिंग झाले आहे.
चाकरमान्याचा परतीच्या प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या प्रवासासाठी आगारात होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नेमणुका तसेच स्वतंत्र वाहतूक कक्षाची देखील उभारणी करण्यात आली आहे.
४० बसेसचे ग्रुप बुकिंग
शिमगोत्सव असो अथवा गणेशोत्सव चाकरमानी एस. टी. महामंडळाच्या ग्रुप बुकिंग योजनेला उत्तम प्रतिसाद देतात. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी तालुक्यातील विविध भागात दाखल झालेल्या चाकरमान्यांनीसुद्धा ग्रुप बुकिंगला विशेष पसंती दिली असून, ४० हून अधिक बसेस आरक्षित झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 9/14/2024
What's Your Reaction?