पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासंबंधी प्रारूप अधिसूचना जाहीर

Sep 14, 2024 - 13:39
 0
पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील  क्षेत्रासंबंधी  प्रारूप अधिसूचना जाहीर

रत्नागिरी : भारत सरकारच्या पर्यावरण, वन व  वातावरण बदल मंत्रालयाने प्रारूप अधिसूचना दि. ३१ जुलै २०२४ अन्वये पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासंबंधी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये चिपळूण तालुक्यातील ४४ गावे , खेड तालुक्यातील ८५ गावे , लांजा तालुक्यातील ५० गावे , राजापूर तालुक्यातील ५१ गावे आणि संगमेश्वर तालुक्यातील ८१ गावे अशी जिल्ह्यातील एकूण ३११ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे आहेत. चिपळूण तालुक्यातील अडरे अकुशंखानगर, आनारी, बामणोली, डेरवण, धाकमोली, दुर्गेवाडी, दुर्गवाडी खुर्द, गाणे, गणेशपूर, कादवड,कळकवणे, कामधे खुर्द, खरवते, खोपड, कोळकेवाडी, कोंड फणसवणे, कोंडमळा, कुडप, कुंभाली, कुटरे, मजरे (गोवळ), मंजुत्री, मोरवणे, मुंडे तर्फे चिपळूण, मुंढे तर्फे सावर्डे, नांदीवसे, ओवळी, पाथे, पेढांबे, पेवे-पर्शुराम, फरूस, पोफळी, पोफळी बुद्रक, रिक्टोली, शिरगांव, स्वंयदेव, तळवडे, तळसर, टेरव बुद्रुक, तिवडी, तिवरे, तुरंबव, उभाले अशा ४४ गांवाचा समावेश आहे.

खेड तालुक्यातील ऐनी, अंबडस, आंबवली, अष्टी मोहल्ला, आस्तान, बजरंग नगर, बेलसाई बुध्दवाडी, बेलसाई चौथाई, चिरमणी, चाटव, चिंचवडी, चोरवणे, चोरवणे उत्तेकरवाडी, दहिवली, देवघर, धामणंद, धामणंद,  गावठान, देवधे, दिवाणखवटी, घेरारसाळगड, घेरा पाळगड, घेरा सुमारगड, घोगरे हुभरी, जामगे, जावळी गावठाण, कळबंणी बुद्रक, कळवबंणी खुर्द, कांदोशी, कर्टल, कसबा नातू, कसाई, कवळे, कळणे, खालची हुंबरी, खोपी, खोपी तांबटवाडी, किंजळे तर्फे खेड, किंजळे तर्फे नातू, कोंडवाडी, कुंभाड, कुंबवली, कुरवळ गावठाण, मिलें, मोरवंडे खुर्द, नादगांव, नंदीवली, नवानगर, निवे, पाखरवाडी, पासरे बुद्रक, पासरे खुर्द, पोयनार खुर्द, प्रभुवाडी, पुरेखर्दु, साखर, साखरोली, साखरोली खुर्द, सनगर, संगलोट, सार्पिली, शिगरी, शिरगांव, शिरगांव खुर्द, शिवखुर्द, शिवतर, तळवट जावळी, तळवट खेड, तळवट पाल, तिसंगी, तिसेखुर्द, तुळशी बुद्रक, तुळशी खुर्द, वारवली, विहाळे, वडगांव बुद्रक, वडगांव खुर्द, वाडीबीड, वाडीमलदे, वावेचिचटवाडी, वावे जाभूळवाडी, वावे तर्फे खेड, वावे तर्फे खेड गावठाण, झागडेवाडी अशा ८५ गावांचा समावेश आहे. लांजा तालुक्यातील आगरगांव, आरगांव, बोणखोर, बापरे, भाडे, भावंड, बोरथडे, युध्दवाडी तर्फे वे वली बुद्रक, चाफे, चिंचुटी, डाफळे, गुरववाडी, हरचे ,हर्दखळे, हसोल, इसवली, जायदे, कांगवली, कांटे, कातळगांव, खानवली, खोरगांय, खोरनिनको, कोचरी, कोंडगे, कोंडगांव, कुडेवाडी, कुंभारगांव, कुरंग, कुरचुवं माचाळ, माजळ, नामे, निवाशी, पालू, पानोरे, पाटीलगांव, प्रभानवल्ली, पुरगांव, रामगांव, रायरी, रिंगणे, रूण, सालपे, शिरवंयल्ली, वेरळ, वेसुले विलवडे, वाग्रट, वाकेड अशा ५० गावांचा समावेश आहे. 

राजापूर तालुक्यातील आगरेवाडी, बाग काझी हुसेन, बांदीवडे, भराडे, चिखले, धामणपे, डोंगर, गोठणे दोनीवडे, हरळ, हदी, हासोळ तर्फे सौंदंळ, हत्तडे, जांभवली, काझीरडा, करक, करीवली, केळवडे, खिंगणी, कोळंब, कोळणखाडी, कोंडदसुर, कोंडसर खुर्द, कोतापूर, कुंभावडे, म्हाळुंगे, मिलंद, मोसम, ओसीवळे, पाचळ, पहिलीवाडी (ताम्हाणे), पाल्ये, पांगरी बुद्रक, पांगरी खुर्द, पन्हाळे तर्फे सौदंळ, पुरूळे, पाथर्ड पाटकरवाडी, फुपेरे, प्रिदांवन, कोंडे राजापूर (म्यु.), सौर्दळ, सावडव, शेजवली, तिवरे, वाल्ये, वरची गुरववाडी, वरचीवाडी, वाळवड, वाटूळ, येडब, झरये अशा एकूण ५१ गांवाचा समावेश आहे.

संगमेश्वरमधील आगरेवाडी, आंबेत, अणदेरी, आंगवली, असावे, आसुडे, बामणोली, बेलारी बुद्रक, बेलारी खुर्द, बेलारी वाडी, भांडखंबे, भोवडे, बोंडे, चांदीवणे, चाफवली, डाखीण, देवधे देवाळे, घेराप्रचीतगड, देवघर, धामणी, हिंगणी, गोळवली, गोठणे, हात्तीव, हेदळी, कारंडेवाडी, कासे, कातवली, कातुर्डी कोंड, खडीकोळवण, किंजळे, किरबेट, कोंडअंबेड, कोंडभैरव, कोंडओझरे, कोंडरन, कुचांबे, कुळे, कुभांरखाणी बद्रुक, कुभांरखाणी खुर्द, कुंडी, कुरधुंडा, कुटगिरी, मळदेवाडी, मांजरे, मसरंग, मठ धामापूर, मावळंगे, मुर्शी, नायरी, निगडवाडी, निनावे, निवळी, निवदे, ओझरेबुद्रक, पांचाबे, फणसावळे, पिरंदवणे, राजवली, रांगव, रातांबी, संगमेश्वर, सायली, शेववणे, शेनवडे, शिंदे आंबेरी, शिरंबे, श्रृगांरपुर, सोनारवाडी, तळवडे तर्फे देवरूख, तांबेडी, ताम्हणळे, थोरली धामणी तिवरे घेराप्रचितगड, तुरळ, उमरे, उफळे, विकासनगर, वाडी आधिष्टी, वाशी तर्फे संगमेश्वर अशा ८१ गांवाचा समावेश आहे.

अधिसूचनेस अंतिम स्वरूप प्राप्त होण्यापूर्वी प्रारूप अधिसूचनेत नमूद केलेल्या क्षेत्रातील (गावांतील) लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवासी यांना कोणत्याही प्रकाराच्या सूचना, हरकती, अगर तक्रार असल्यास त्यांनी एन्व्हार्मेंट प्रोटेक्शन अॅक्ट १९८६ आणि नियम १९८६ मधील तरतुदीनुसार त्यांच्या सूचना, आक्षेप लेखी स्वरूपात ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली ११०००३ यांच्याकडे किंवा ई-मेल आयडीवर नोंदवायचे आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:05 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow