कशेडी एका बोगद्यातील वाहतूक २० सप्टेंबरपासून बंद

Sep 17, 2024 - 14:37
 0
कशेडी एका  बोगद्यातील वाहतूक २० सप्टेंबरपासून बंद

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यपैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. हा बोगदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरपासून वाहतुकीस मोकळा केला होता.

गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती; मात्र त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू होते. यंदा २५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना या बोगद्याचा वापर कोकणात येण्यासाठी करण्याची परवानगी देण्यात आली.  

एक वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत झाला तरीही माणगाव, इंदापूर, कोलाड या दरम्यान महामार्गावरील अपूर्ण असलेल्या कामामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही वाहतूककोंडी, मोकळी केली होती. पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशा झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने राष्ट्रीय बाधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिस यांनी योग्य नियोजन केले होते. 

त्यामुळे या परिसरात कुठेही वाहतूककोंडी झालेली नाही. गौरी- गणपती विसर्जन आटपून परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूककोंडींचा फारसा फटका बसला नाही. कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातील खवरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली. दोन्ही बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे कशेडी घाटातून येण्याचा चाकरमान्यांचा वेळ वाचला आहे.

कशेडी येथील दुसऱ्या बोगद्यातील कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण २० सप्टेंबरपासून कार्यवाही करण्यात येणार आहे कामे पूर्ण करण्यासाठी पुढील एक ते दीड महिन्यासाठी बंद ठेवण्यात येईल - पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

अपघातांना आळा बसला
सद्यःस्थितीत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता एका बोगद्यातून संपूर्ण मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली असून नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या बोगद्यातून गोव्यार जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बोगद्यातील अपघा आळा बसला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow