मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. बेशिस्त आणि बेफिकीर ग्रामस्थ उघड्यावर कचरा टाकत आहेत. ग्रामपंचायतीने याकडे गांभियनि लक्ष देऊन साफसफाई करावी आणि वेशिस्त कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
ग्रामपंचायतीने गावात नालेसफाई करण्याची गरज आहे. तसेच कचरा कुंड्या साफ ठेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्याने या कचऱ्यातील दूषित पाणी अन्य भागात वाहून जात असल्याने तेथील पिण्याच्या पाण्याचे साठे व विहिरी प्रदूषित होण्याची शक्यता आहे. आता पावसाळ्यात रहिवाशांना साथीच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागणार आहे. ग्रामपंचायतीने रहिवाशांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून गाव स्वच्छ ठेवण्याची मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 12-06-2024
What's Your Reaction?