अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता
Maharashtra Weather Update च्या संदर्भात हवामान विभागाने दिलेला अंदाज पाहता, राज्यात २२ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज असून, कोकण व विदर्भात तुलनेने कमी पाऊस राहील, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. परतीचा पाऊस आणि हवामान विभागाचा अंदाज
राजस्थानातून परतीच्या पावसासाठी सध्या अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. तेथे १९ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थानमधून परतीचा पाऊस सुरू झाल्यास देशातील इतर भागांतील मान्सूनच्या प्रवासालाही नवे वळण मिळणार आहे. अंदमान समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १९ सप्टेंबर रोजी अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. या प्रणालीचा थेट प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान बदलांचा अंदाज घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














