जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचं दहन
रायगड : राज्य सरकारने नवीन अभ्यासक्रमात लागू केलेले श्लोक हे पुन्हा मनुस्मृती निर्माण करणारे आहेत त्यामुळे विद्यमान सरकार या अशा अभ्यासक्रमांचा वापर करून पुन्हा मनुस्मृती जन्माला घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
मात्र महाड पोलिसांकडून त्यांना हे आंदोलनं रोखण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यव्यवस्था अबाधित राहावी आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरीता आता महाड पोलीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात पाऊल उचललं तर कोणती करवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यापूर्वी आव्हाड यांनी चवदार तळ्यातील पाण्यात उतरून ओंजळीने पाणी पिले. त्यांच्यासोबत मिलिंद टिपणीस आणि इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 29-05-2024
What's Your Reaction?