राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात १४८.७१ टीएमसी वाढ

Jul 26, 2024 - 14:59
 0
राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात १४८.७१ टीएमसी वाढ

पुणे : गेल्या पाच दिवसांत राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात १०.३८ टक्के, म्हणजेच १४८.७१ टीएमसी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरण प्रकल्पांमधील पाणीसाठा ४७.३० टक्क्यांवर पोहोचला आहे.

पहाटे सहा वाजेपर्यंत राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा ६७६.६६ टीएमसी झाला.

यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला होता. तसेच मोसमी पाऊस विलंबाने सक्रिय झाल्याने धरणे कधी भरणार याकडे लक्ष लागले आहे. राज्यातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४३०.६३ टीएमसी आहे. मात्र राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सहा वाजेपर्यंत राज्यातील सर्व धरणांत मिळून ६७६.६६ टीएमसी पाणीसाठा झाला. कोकण विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १३०.८४ टीएमसी आहे. आता धरणांमध्ये १००.७३ टीएमसी (७६.९७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता ५३७.२८ टीएमसी आहे. आता होत असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा २९७.८१ टीएमसीवर (५५.४४ टक्के) पोहोचला आहे. नाशिक विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता २०९.६१ टीएमसी आहे. धरणांत ७७.१७ टीएमसी (३७.०६ टक्के) पाणीसाठा आहे. मराठवाडा विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता २५६.४५ टीएमसी आहे. धरणांत ३४.०५ टीएमसी (१३.२७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. अमरावती विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १३६.७५ टीएमसी आहे. धरणांत ६४.६६ टीएमसी (४८.४१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १६२.७० टीएमसी आहे. धरणांत १०१.७० टीएमसी (६२.५१ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow