रत्नागिरी : भाट्ये पुलाजवळ धोकादायक खड्डा
रत्नागिरी : भाट्ये पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला पुन्हा एकदा मोठा खड्डा पडला आहे.
पावसात हा खड्डा दिसत नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा खड्डा रत्नागिरी पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ भरावा, अशी मागणी होत आहे.
भाट्ये पुलावर रत्नागिरी शहराकडून पावसकडे जाताना सुरवातीलाच मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा पावसकडून येताना वाहनचालकांना दिसत नाही. तेथील काँक्रिटीकरण सलग झाले आहे. त्यामुळे हा खड्डा धोकादायक बनलेला आहे. गाडी खड्ड्यात जाऊन आपटली की मगच खड्डा लक्षात येतो. खड्ड्याच्या बाजूला असलेल्या बारीक खडीमुळे अनेक दुचाकीस्वार खड्ड्यात आपटतात. यामध्ये गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील या भागातच खड्डा पडला होता. यावर आवाज उठवल्यानंतर तो भरण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे पुन्हा त्याच भागात खड्डा पडला आहे. तो तातडीने भरला जावा, अशी सर्वांची मागणी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 19-07-2024
What's Your Reaction?